2024 मध्ये पुन्हा मोदीच येणार हे शरद पवारांनीच सांगितलं : भुजबळ

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबईः
सन 2024 च्या निवडणुकीत पुन्हा मोदी सरकारच येणार आहे, असं शरद पवार यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचं नेतृत्त्व नाकारता येणार नाही, असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

छगन भुजबळ म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पण त्यांनी केलेला विकास नाकारता येणार नाही. तत्काळ निर्णय घेण्याची ताकद मोदी यांच्यातच आहे.


विकासाचे अनेक प्रश्न आहे. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर केंद्र सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आम्हाला सर्वांना मान्य आहे. तसेच आमच्यावर आरोप होतोय की तुरुंगात जाण्याच्या भीतीने आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. मात्र आज शपथविधी झालेल्यांपैकी आमच्या कोणावरही आता गुन्हा नाही. अजित पवार आणि माझ्यावरचे सर्व आरोप रद्द झाले आहेत. अदिती तटकरे, धनंजय मुंडे व आमच्या अन्य मंत्र्यांवर गुन्हा नाही. हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपाचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ म्हणाले, काही दिवसांपूर्वी शरद पवारच म्हणाले होते की मी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांचच सरकार येणार आहे. अस असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणं चुकीच ठरणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत.
गेल्या वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भुकंप झाला होता. 30 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने दोन दिवसांपूर्वी वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. त्यानंतर आता आज (दि‌.2 जुलै) पुन्हा एकदा राजकारणात भुकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मारावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकारणाच्या राजकारणातील ही आजच्या घडीतील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आदिती तटकरे या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!