आपल्या संस्कृतीचे संवर्धन व जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – सोनीदेवी शर्मा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – आज भारतीय संस्कृती हे जगात सर्वश्रेष्ठ मानली जात आहे, आपल्या संस्कृतीचे संवर्धन व जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी विद्यार्थी दशेतच या विषयी मुलांना ज्ञान देणे गरजेचे आहे. आपली भावीपिढी सुसंस्कृत व ज्ञानी व्हावी, यासाठी विश्व हिंदू परिषद चांगले काम करत आहेत. विविध उपक्रमातून एक सक्षम पिढी घडवत आहेत. समाजातील वंचित मुलांचे भविष्य उज्वल व्हावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी जो मदतीचा उपक्रम राबविला तो कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या साहित्याचा चांगला उपयोग करुन स्वत:चे भविष्य घडवावे, असे प्रतिपादन कॅनरा बँक व एचएसबीसी विमा कंपनीच्या शाखाधिकारी सोनीदेवी शर्मा-दुबे यांनी केले.
![](http://sangramsattacha.com/wp-content/uploads/2023/07/20220827_120006-1-932x1024.jpg)
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शेवगांव येथील श्री संत धुंडा महाराज देगलुरकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी उत्तर प्रदेश (झाशी) येथील प्रांत संयोजिका व कॅनरा बँक व एचएसबीसी विमा कंपनीच्या शाखाधिकारी सोनीदेवी शर्मा-दुबे, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे,, शहर मंत्री श्रीकांत नांदापुरकर, रविंद्र सिद्धेश्वर, रा.स्व.संघाचे विस्तारक भास्कर साखरे, माजी प्राचार्य सुधाकर आपटे, वसतीगृहाचे विश्वस्त डॉ.स्वाती उगले, अधिक्षक विजय सोनवणे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मुकुल गंधे म्हणाले, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सेवा, सुरक्षा, संस्कार या त्रिसूत्रीनुसार देशात काम सुरु आहे. ‘सेवा परमोधर्म:’ याप्रमाणे मदतीचा हात देत आहोत. आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक असल्याचे तो सुदृढ व शिक्षित झाला पाहिजे या उद्देशाने हा मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे. मुलांवर चांगले संस्कार करणार्या श्री संत धुंडा महाराज वसतीगृहाचे कार्य महान असून, त्यांच्या कार्यास छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केल्याचे श्री.गंधे यांनी सांगितले.या उपक्रमासाठी नगरसेवक पै.सुभाष लोंढे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सोनवणे यांनी केले तर डॉ.स्वाती उगले यांनी सर्वांचे आभार मानले.