राज्‍यसभा निवडणूक : नाट्यमय घडामोडीत मविआचे 3 तर भाजपाचे 3 उमेदवार विजयी


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई –
भाजप व महाविकास आघाडी या दोन्ही विरोधकांनी एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतला. यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली. ८ तास मतमोजणी रखडली होती. या बैठकीनंतर आयोगाच्‍या निर्देशानुसार शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले. यानंतर मतमोजणीस प्रारंभ करण्‍याचे निर्देश दिले होते. मतमोजणीत भाजपचे ३ उमेदवार व महाविकास आघाडीचे ३ उमेदवार विजयी झाले.


संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पहिल्‍या क्रमांकाच्‍या मतानुसार आम्‍हीच जिंकलो आहोत. भाजपने जागा जिंकल्‍या असल्‍या तरी ते विजयी नाहीत. काही अपेक्षित बाहेरची मत न पडल्‍यामुळे आम्‍ही संजय पवार यांची जागा गमावली. निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला विजय ?
किंगमेकरच्‍या भूमिकेत असलेले देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्‍हटले की, हा विजय महाराष्‍ट्राच्‍या जनतेला समर्पित करतो. जे स्‍वत:ला महाराष्‍ट्र समजतात त्‍यांना आजचा निकाल चोख उत्‍तर आहे. ही विजयाची मालिका सुरु झाली असून आता खंडित होणारी नाही. भाजपचे तीनही नेते विजयी झाले आमच्‍यासाठी आनंदाचा क्षण आहे.हा विजय आम्‍ही आमचे लढवय्ये आमदार लक्ष्‍मण जगताप यांना समर्पित केला आहे.
मविआचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार जिंकले
पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीमध्‍ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
मविआ कडून संजय राऊत, प्रफुल्‍ल पटेल आणि कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी वियजी झाले आहेत.
त्‍याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.
महाडिकांच्‍या विजयाचा जल्‍लोष
अत्‍यंत प्रतिष्‍ठेच्‍या आणि चुरशीच्‍या समजल्‍या गेलेली सहावी जागा धनंजय महाडिकांनी संख्‍याबळापेक्षा अधिक मतांनी जिंकल्‍यानंतर महाडिक यांच्‍या घरी जल्‍लोष सुरु केला. महाडिक कुटुंबियांनी गुलालाची उधळण केली.
कोणाला मिळाली किती मतं ?
इम्रान प्रतापगढी – 44
प्रफुल्‍ल पटेल – 43
संजय राऊत – 41
अनिल बोंडे – 48
पियुष गोयल – 47
संजय पवार – 33
धनंजय महाडिक – 42
👉सुहास कांदे यांचे मत बाद
शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरता बाकी मतांची मोजणी सुरु करण्‍याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेजची पाहणी केल्‍यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नसल्‍याचे व्हिडिओमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसते. म्‍हणून आयोगाने कांदे यांचे मत ग्राह्य न धरता इतर मतांची मोजणी करण्‍याचे निर्देश दिले आहेत.
👉निवडणूक आयोगाने फुटेजही तपासले
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप आणि महाविकास आघाडीने आक्षेप नोंदवले त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी एकत्रित बसले, मतदान प्रक्रीयेवेळीचे फुटेजही अधिकारी तपासले. यावर विचारविनिमय त्यांनी केला.
👉महाविकास आघाडीचेही आक्षेप
भाजपच्या आक्षेपाची दखल घेताच महाविकास आघाडीनेही रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. तुर्तास मतमोजणी तीन तासांपासून रखडलेली आहे. तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतच थांबा, अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून प्राप्त झाल्या आहेत.
👉भाजपच्या आक्षेपांची दखल
राज्यसभेसाठी मतदान प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे; पण भाजपनेही मतदान प्रक्रीयेवेळी तीन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हा आक्षेप फेटाळला होता; पण या प्रक्रीयेचे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर तीन पानांचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर भाजपच्या आक्षेपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली.
👉कोणत्याही नियमांचा भंग केला नाही- आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला असून त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी मतदानाची क्रिया केली त्यातून माझे मत बाद व्हावे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण नसताना खेळ लांबवर घेऊन जाण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. मी विवेकाने मतदान केले आहे. कुठेही मी मतपत्रिका दाखवली नाही पण तसा सम्रंभ निर्माण केला जात आहे. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा हा प्रकार असून याचाच खूलासा करण्यासाठी मी माध्यमासमोर आलो असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
👉मतमोजणी थांबवल्याने राऊतांची टीका
भाजपचा आक्षेप त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेली दखल त्यानंतर थांबलेली मतमोजणी यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या संतप्त भावना ट्विटमधून व्यक्त केल्या. महाराष्ट्रात असाच खेळ सुरु आहे ‘घटीया पाॅलिटीक्स’ हे त्यांचे एक ट्विट असून राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? असा सवाल करुन त्यांनी ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला अशी टीका करीत आम्हीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.
👉काॅंग्रेसचाही आक्षेप
आता आयोगाचा पावित्रा काय असेल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे, या गोष्टींमुळेच निवडणूक प्रक्रीयेला सुमारे एक तास उशीर झाला आहे. तत्पुर्वी आमदारांचे मतदान पुर्ण झाले असून मतमोजणीलाही सुरूवात झाली. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.
यात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सूहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. नवाब मलिकांना हायकोर्टाचा पुन्हा झटका, विशेष पीएमएलए न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
👉हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिकांनी याचिकेतील जामिनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत पुन्हा नव्याने याचिका केली. मात्र, ही याचिका ऐकूण घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे नवाब मलिकांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
👉शिवसेनेच्या 42 आमदारांची पहिल्या पसंतीची मते संजय राऊत यांना
👉संजय पवार यांना शिवसेनेच्या 13 आमदारांची पहिल्या पसंतीची मते
👉राष्ट्रवादीची 2 आणि काँग्रेसची 9 मतते संजय राऊतांना
👉विधानभवनात शिवसेना व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू, दोन्ही पक्षांच्या मतदानानंतर आकडेवारीवर खल
👉एमआयएमच्या दोन आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा
👉भाजपकडून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप, मात्र अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!