महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन आहे. परंतु कॉंग्रेस मात्र सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच काल शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा दिला.
तर आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे खळबळ माजली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सध्या सत्तेत सोबत असलेले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा खळबळजनक आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.
महाराष्ट्रातील अशा सर्व भीषण राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गाठली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ निर्माण झाली आहे. या दिल्ली दौ-यात शरद पवार नेमके कोणा-कोणाला भेटणार ? या अचानक ठरवलेल्या दौर्याचे नेमके कारण काय ? असे एक न अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. तसेच या दौर्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार का? हे पाहणे देखील अनेकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.