संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- मुंबईत जे काही घडतय त्याला मुख्यमंत्री जबाबदार राज्यात जे काही घडतय त्याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे विरोधीपक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी पञकारांशी बोलताना केला.
श्री फडणवीस पुढे म्हणाले की, भोंग्यांच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे निर्णय दिलेले आहेत त्याच कायदेशीर पालन व्हाव. नवनीत राणा यांना कस्टडीमध्ये अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली जात आहे, असे म्हणत ते म्हटले कीं, हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकीस्तानात जाऊन म्हणायची का ? ठाकरे सरकार फडणवीसांचा सवाल केला. हनुमान चालिसा म्हणलो म्हणून देशद्रोहाचा गुन्हा लावणार मी म्हणतो हनुमान चालिला लावा माझ्यावर देशद्रोह असेही यावेळी ठणकावून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.