महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. वजाहत मिर्झा 

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – 
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना अध्यक्षपदी निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र अल्पसंख्याक विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी शुक्रवारी मंत्रालय येथे प्रदान केले.

राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी डॉ. वजाहत मिर्झा यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. मंडळावर आता १० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचीही निवड झाल्याने वक्फ मंडळ आता संपूर्ण क्षमतेने कामकाज करु शकेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
वक्फ अधिनियम १९९५ या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार राज्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आलीये. मंडळात आता दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुंदीप्रमाणे मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज २६ नोव्हेंबर २०२१ रोजी बैठक आयोजित करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!