संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील एकमेव बुरूडगाव ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. ती सो सोडवण्यासाठी बुरूडगाव ग्रामपंचायत पाणी योजनेचा जिल्हा परिषद कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
या अनुषंगाने या परिसराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा परिषदेच्या आराखड्यात समावेश करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना ही मागणी केली होती. या अनुषंगाने बुरूडगाव पाणी योजनेचा समावेश जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात झाला आहे. या कामासाठी अंदाजे 3 कोटी 12 लाख रुपये रक्कम उपलब्ध होणार आहे. पुढील कार्यवाहीसाठी शासनामार्फत नियुक्त केलेली एजन्सी सर्वे करून पुढील प्रशासकीय मान्यतेसाठी सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. सदरची योजना पूर्ण झाल्यास गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण बुरुडगाव ग्रामस्थांचा असलेला जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे असे, श्री जगताप यांनी म्हटले.