बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना काळजी घ्यावी – उपवनसंरक्षक सुवर्णा माने


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन  नेटवर्क
अहमदनगर :-
अहमदनगर जिल्ह्या च्या  सर्वत्र भागांत बिबट्यांचा वावर असून ऊसाची शेती हे बिबट्याचे आवडते लपण क्षेत्र आहे. सध्या  ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असुन ऊसतोड करत असतांना शेतकरी व मजुरांनी आवश्यपक ती काळजी घेतल्यायस मानव व बिबट संघर्ष टळू शकेल असे आवाहन अहमदनगर जिल्ह्या चे उपनवसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे.
ऊसतोड सुरू असतांना बिबट्यांचे स्थतलांतराचे प्रमाण वाढते सायंकाळी बिबट्या शिकारीसाठी बाहेर पडण्यााची वेळ असते. ज्यार भागात बिबट्यांचा वावर आहे अशा बि‍बट प्रवण क्षेत्रात सायंकाळ नंतर ऊसतोड किंवा शेतीची कामे करु नयेत. अशावेळी बिबट्याशी  आमना सामना होऊन काही वेळा दुर्घटना घडण्या ची शक्यसता असते.
सद्यस्थितीमध्येद ऊसतोड हंगाम सुरू असुन ऊसतोड सुरू असतांना मजुरांनी व संबंधित शेतक-यांनी आपल्या् लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. अनेकदा ऊसतोड सुरू असलेल्या  भागातच मोकळे खेळायला सोडले जाते अशावेळी त्यांसच्याीवर बिबट्यांचा हल्लाा होण्याेची शक्यगता असते ज्याा ठिकाणी मुलांना ठेवले जाते तिथे हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्ययक्तीास थांबवावे जेणेकरुन बिबट्या दिसल्याास मुलांची सुरक्षा करता येते. खुप वाकुन ऊसतोड करू नये, अशावेळी दुसराच एखादा चार पायाचा प्राणी आहे असे समजुन बिबट्याचा पाठमोरा हल्लास होऊ शकतो. ऊसतोड सुरू असतांना ट्रॅक्टीर मधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्याम वायरलेस ब्युह   टुथ स्पीाकरचा वापर करुन मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत. यामुळे बिबट्या जवळ येण्यााची शक्यलता कमी होते. एकावेळ किमान पाचच्याक संख्येाने काम करावे. एकट्या व्यसक्तीेने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नये. अनेकदा ऊसतोड सुरू असतांना शेतात बिबट्यांची किंवा रान मांजराची पिल्लेय सापडतात. रानमांजराची असल्या स काही धोका नसतो. बिबट्याची असल्या‍स या पिलांच्याि जवळ न जाता ऊसतोड थांबवावी व जवळच्या  वनविभाग कार्यालयास माहिती द्यावी. ही पिल्ले  हातात उचलुन घेऊ नये किंवा ती पाहण्याासाठी गर्दी करु नये. पिलांची आई आसपासच दबा धरुन बसलेली असू शकते. अशावेळी ती पिल्यावच्याा रक्षणासाठी माणसावर हल्लाा करु शकते. पिलाना न हाताळता पिल्लेश जागेवरच राहु द्यावी. मादी तिचे पिल्लेा पुन्हा  सुरक्षित स्थवळी हवलते. यावेळी तिचा सामना झाल्याहस तिच्यााजवळ जाऊ नयेत किंवा तिला हुसकून लावण्यालचा प्रयत्ना करु नये. शेतात बिबट्याची पिल्लेा सापडल्यानस त्यांतना हाताळु नयेत किंवा त्यांंच्याे सोबत फोटो काढु नयेत त्यां ना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करु नये असे करणे वन्यलजीव संरक्षण कायद्याने गुन्हाा आहे, असे आढळुन आल्यातस अशा नागरीकांवर वनविभागामार्फत कार्यवाही करण्या त येईल.
अलिकडच्या  काळात वाढत्याी ऊस क्षेत्रामुळे मानव व बिबट्या हे सहजिवन बनलेले आहे. बिबट्या बाबत अधिक माहिती हवी असल्याास नजिकच्याय वन कार्यालयास संपर्क साधुन किंवा जाणकार व्य क्ती  कडुन माहिती घ्याुवी. या सर्व बाबींसाठी आपले सर्वांचे वनविभागास सहकार्य मिळेल यात शंकाच नाही तसेच वन्यंजीव आपले शत्रु नाहीत त्यां्च्याप सानिध्याित राहतांना आपण थोडी काळजी घेतली तर निश्चित संघर्ष टाळला जाऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!