पाथर्डी तालुक्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्र्याशी सानप यांची चर्चा ; मागणीचे निवेदन


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाणी समस्या सोडवण्यासाठी विविध योजना या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत समाविष्ट कराव्यात, अशी मागणी मुंबई मंञालय येथे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप (रा विठ्ठलवाडी ता. पाथर्डी, जि.अहमदनगर) यांनी केली आहे. यावेळी मंञी पाटील यांनी त्यांच्या विभागाच्या सचिवास संबंधित कामकाजाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत.

स्वच्छता व पाणीपुरवठामंञी गुलाबराव पाटील यांची मुंबई येथे पाथर्डी मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान, श्री सानप यांनी पाथर्डी तालुक्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मंञी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. निवेदनात भगवानगड परिसर व ४७, गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, हादगाव पाणीपुरवठा योजना, अमरापूर ते माळीबाभुळगाव, ४९ गावे योजनेचे सर्वेक्षण व अंदाजपत्रके तयार करणे, शहर टाकळी २४ गावे प्रादमहोद पाणीपुरवठा योजना, बोधेगाव इतर ७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत समाविष्ट करणेबाबतची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मंञी पाटील यांनी स्वच्छता व पाणीपुरवठा सचिव यांना संबंधित कामकाजाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती श्री सानप यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!