संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शेतकऱ्यांना मिळणार अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प मार्च २०२० मध्ये निर्णय घेतला होता की, ५० हजार रुपये अनुदान किंवा मदत देण्यात येणार आहे. सदरचे अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. परंतु कोरोना आजाराच्या संकटामुळे सदर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले नव्हते. याच कारणामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान किंवा मदत द्यावी, याबाबतचे मागणी निवेदन पाथर्डीचे सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब पाटील सहकारमंत्री यांना दिले होते. मा.मंत्री यांनी सानप यांच्या निवेदनाची दखल घेऊन प्रधान सचिव सहकार विभाग यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले होते.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री यांनी याबाबत विशेष बैठक आयोजित करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. दि.१ जुलै पासून शेतकऱ्यांना अनुदान वाटप होणार आहे असे सानप यांनी सांगितले आहे.
👉🏻संकलन-पत्रकार सोमराज बडे