👉विठ्ठलवाडीत भूमिपुत्र शासकीय सेवानिवृत्त ३३ जणांचा सत्कार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – जो संस्कारक्षम वारसा जुन्या पिढीने आम्हाला दिला आहे. तोच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आगामी काळात जुन्या-जाणत्या लोकांची मदत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू. आपल्या पदाच्या माध्यमातून गावाबरोबर तालुक्यातील वंचित उपेक्षित लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन चांगले काम करू दाखवत विठ्ठलवाडी गावाबरोबर तालुक्याचे नाव उज्ज्वल करून दाखवू असा विश्वास संजय गांधी निराधार योजनेच्या समितीचे अध्यक्ष वैभव दहिफळे यांनी व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्यातील विठ्ठलवाडीचे भूमिपुत्र हे शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सुमारे ३३ कर्मचाऱ्यांचा हनुमान आणि खंडोबाच्या यात्रेचे औचित्य साधून आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री दहिफळे बोलत होते.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या समिती पदाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गावच्या वतीने दहिफळे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दहिफळे म्हणाले की, तालुक्याला अनेक ज्येष्ठ नेत्यांची परंपरा आहे. त्यापैकी माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे आहेत.यांच्या मार्गदर्शनाखाली अँड प्रताप ढाकणे हे तालुक्यात चांगल्या विचाराने सामाजिक आणि राजकीय काम करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहे. येणाऱ्या काळात आपल्या पदाचा उपयोग चांगल्या कामासाठी होऊन न्याय देण्याची भूमिका राहील असेही दहिफळे म्हणाले.
प्रास्ताविक उमेश सोनवणे तर सूत्रसंचालन द्वारकानाथ दहिफळे आभार पांडुरंग दहिफळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी दहिफळे, तुळशीराम दहिफळे, उमेश दहिफळे, उमेश सोनवणे, देविदास दहिफळे, रामदास दहिफळे, भारत दहिफळे,दिलीप दहिफळे, प्रताप दहिफळे, राजेंद्र दहिफळे आदींनी परिश्रम घेतले.
.