जिल्ह्यात निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यास मनाई जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्ह्यात निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यास मनाई जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवीनगर
📥लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
जिल्ह्यात निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यास मनाई जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघ (३७) व शिर्डी लोकसभा मतदारसंघात (३८) येथे दि.१३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या जावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार दि. 16 मार्च ते 6 जुन, 2024 या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमास शस्त्र परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगुन फिरण्यास सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.
*******
📥
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार दि. 13 मे, 2024 रोजी मतदान सुरु झाल्यापासुन ते संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील मतदान होणाऱ्या केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******
📥
नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक प्रचारास मनाई
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करतांना आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दि. 13 मार्च ते 13 मे, 2024 या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहे
लोकसभा निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे,वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******
📥
जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
अहिल्यादेवी नगर :- जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये जिल्ह्यात 20 मार्च ते 2, एप्रिल, 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*******
📥
शासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह कार्यालय परिसरात मनाई आदेश जारी
अहिल्यादेवीनगर :- जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दि. 16 मार्च ते 13 मे, 2023 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उप विभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये तसेच शासकीय विश्रामगृह येथे कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे एक आदेशाद्वारे कळविले आहे.
*******
📥
खोटे संदेश तसेच फेकन्युजची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर
अहिल्यादेवीनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला असुन त्याचा क्रमांक 9156438088 असा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका पत्राद्वारे दिली आहे.
या क्रमांकावर जनतेकडून मिळालेल्याउए माहितीची नियंत्रण कक्षातील प्रभारी नियंत्रण अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक (सायबर) यांच्या मदतीने माहितीची शहानिशा करुन आावश्यक ती कारवाई करावी,असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!