संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली ः लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणार्या लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (ता. 16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. पण निवडणूक आयुक्तांकडून तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला आहे.
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. देशातील दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. तर त्याहून अधिक लोकसभा मतदारसंघ म्हणजेच 80 लोकसभा उत्तर प्रदेशात आहेत. ज्यामुळे त्या राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. मुंबईत महाराष्ट्रातील पाच टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात होणार्या पाच टप्प्यांमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 07 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदार होणार असून 19 एप्रिलला होणार्या पहिल्या टप्प्यांत 5 जागांसाठी, दुसर्या टप्प्यांत 8 जागांसाठी, तिसर्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी 11 जागांसाठी आणि पाचव्या टप्प्यांत 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.