संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इ.१०वी व १२ वी परीक्षा ऑनलाइन घेतल्या आहेत तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिंती असूनही, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इ. ५वी इ.८वी या वर्गाची परीक्षा ऑफ लाईन घेण्याची तयारी आहे, या शिक्षण विभागाच्या निर्णयावर अनेक पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी, संगमनेर, पारनेर, शेवगाव या तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन शासनाने इ.१०वी व १२ वी परीक्षा ऑनलाइन घेतल्या आहेत. आत तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिंती आहे, असे वारंवार सांगितले जात असतानाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इ. ५वी इ.८वी या वर्गाची परीक्षा आॉफ लाईन घेण्यासाठी मुलांना हाॅल तिकीट वाटप करण्यात आलेली आहेत. परीक्षा दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ती दोन सत्रात सकाळी ११ ते १२.३० व दुपारी १ ते ३ येणार असून एका परीक्षा केंद्रावर पाच ते सहा गावांतील मुले येतील. यामुळेच मुलांना कोरोना संसर्ग होण्याची भीती जास्त प्रमाणात आहे. मुले परीक्षाकरिता नेण्यासाठी खाजगी वाहनाने पाठवावी लागतील, त्यामुळे मुलांना परीक्षाला पाठवावे की नाही, अशा संभ्रमावस्थेत पालक आहेत. काही शाळा या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकरिता कोविड सेंटर म्हणून दिलेल्या होत्या, तेथे मुलांच्या परिक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे. परीक्षा केंद्रावर कोरोना रुग्ण वाढण्याची भीती ही पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यधिकारी राजेंद्र भोसले यांनी पाथर्डी तालुक्यातील खंरवंडी कासार गावाला ४ दिवस अगोदर भेट दिली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश दिले आहेत. या भयावह परिस्थितीत महाराष्ट्र परीक्षा परिषदेने या सर्व परिस्थितीचा विचार करावा, जर परीक्षा ऑफलाईन घेण्याचे नियोजन असेल, तर कोरोनाची तिसरी लाट कमी झाल्यानंतर घेण्यात यावी, अशीही विद्यार्थीच्या पालकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.