कोरोनात बंद करण्यात आलेल्या बससेवा पूर्ववत सुरु करा ; सामाजिक कार्यकर्ते सानप यांची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
पाथर्डी व आष्टी तालुक्यतील माणिकदौंडी ,मराठवाडी,पत्र्याचा तांडा, डमाळवाडी, मोहरी, हरीचा तांडा, सावरगाव, महिंदा, तारखेस्वर गड या गावांना जोडण्यासाठी गेली पंचवीस वर्षांपासून तारखपूर, तसेच पाथर्डी आगारच्या बस सुरु होत्या, परंतु कोव्हिड मुळे तसेच एसटी कामगाराचा संप यामुळे ही बससेवा बंद करण्यात आली होती. या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा चालू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी राज्य विभाग नियंत्रक अहमदनगर, तारखपूर आगार प्रमुख, पाथर्डी आगार प्रमुख यांना काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते.

याची दखल घेऊन पाथर्डी आगरप्रमुखांनी पाथर्डी ते पांगरा ही बससेवा सुरू केली आहे. यामुळे विदयार्थी,अपंग,वृद्ध तसेच परिसरातील गावातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. असे तुळशीराम सानप यांनी सांगितले.
👉🏻संकलन-पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!