संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाली आहे. या कारणास्तव आयोजित श्री चव्हाण यांच्या औपचारिक निरोप समारंभ कार्यक्रमात अहमदनगर येथील पञकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अहमदनगर प्रेस क्लब चे कार्यकारिणी सदस्य निशांत दातीर, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तथा औरंगाबाद येथील जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे, उर्दू मखदुमचे अबीद खान दुलेखान, ज्ञानधाराचे जयंत देशपांडे, सिटीवॉटचे असद शेख, प्रेस फोटोग्राफर राजू खरपुडे,नगरवेधचे संदीप दिवटे आदिंसह पञकार उपस्थित होते.