वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा, मागणीसाठी वकीलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वकीलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि.९ फेब्रुवारी २०२४) मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकण्यापूर्वीच पोलिसांनी प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच, अनेकवेळ होऊन जिल्हाधिकारी हे वकिलांचे निवेदन स्वीकारण्यास येत नसल्याने काही काळ वकील संतप्त झाले होते.