वंजारी समाजाचे २५ ऑगस्टला
नगरमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर– वंजारी समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी (दि.25 ऑगस्ट 2024) रोजी आहिल्यानगर शहरात गंगा लॉन्स, निर्मलनगर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व समाज बांधवांनी या भव्य दिव्य कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वंजारी समाज महासंघाने केले आहे.
वंजारी समाजाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल असा विश्वास संमेलन स्वागताध्यक्ष विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव पाटील , स्वागत अध्यक्षा रेणुका वराडे, सहस्वागत अध्यक्ष घनश्याम बोडखे, निमंत्रक जिल्हा अध्यक्ष मल्हारी खेडकर यांनी व्यक्त केला.
डिसेंबर 2022 मध्ये नाशिक येथे वंजारी समाजाचे पाहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळी सामाजिक संस्कृतीला बळकटी मिळाली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात संमेलन झाली पाहिजेत आणि यासाठी द्विवार्षिक संमेलन ही पंरपरा निर्माण करण्याचा निर्णय झाला आणि याच निर्णयांच्या अनुषंगाने दि.25 ऑगस्ट ला नगरमधील गंगा लॉन्स संत भगवानबाबा चौक निर्मल नगर येथे हे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेल आहे
या संमेलनासाठी मावळते संमेलनाध्यक्ष प्रा वा ना आंधळे सर यांनी नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ सांगिता घुगे यांची संमेलन अध्यक्षपदी निवड घोषित केली. उद्घाटक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यापल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ गजनान सानप हे आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, आ संग्राम जगताप, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा खासदार सदाशिवराव लोंखडे, मा मंत्री आ बाळासाहेब थोरात, आ प्राजक्ता तनपुरे,आ मोनिका ताई राजळे, आ रोहित पवार ,वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक गणेश खाडे, उद्योगपती बुधाजीराव पानसरे तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातील साहित्यिक यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
सदर संमेलन आयोजित करून सामाजिक समता निर्माण व्हावी यासाठी ऐतिहासिक पाऊल म्हणून याच संमेलनात सामाजिक समतेचे बीजारोपण करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील साहित्यिक यांना देखील गौरविण्यात येणार आहे.सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी नगर जिल्ह्यातील गावागावांतील समाज बांधवां पर्यंत संमेलनाचे निमंत्रण दिले जाईल त्या सोबत जिल्ह्यातील इतिहासात नोंद होईल असं संमेलन आयोजित करून यशस्वी करू असं मत वंजारी समाजाच्या दुसरया राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजकुमार आघाव आणी वंजारी समाज महासंघाचे उपजिल्हा प्रमुख घनश्याम बोडखे यांनी व्यक्त केले.