लोकशाहीत पक्षाला Private party बनविणाऱ्यांना दणका; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला
मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वप्रथम राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. आज लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील लाखो मतदारांचा आज विजय झाला आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork Mumbai मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रियेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लोकशाहीत राजकीय पक्षाला Private party बनविणाऱ्यांना हा दणका देणारा निकाल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली. (CM Eknath Shinde A blow to those who make the party a private party in democracy Chief Minister Shindes challenge to Thackeray)
मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वप्रथम राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. आज लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील लाखो मतदारांचा आज विजय झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या शिवसैनिकाचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजचा विजय हा सत्याचा विजय आहे. सत्यमेव जयते. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिले आहे. निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती ते लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही, हे या निकालाने अधोरेखित केल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.