राष्ट्रसंत श्री भगवानबाबांच्या समाधीचे आ.रोहित पवारांनी घेतले दर्शन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डीः-राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या दर्शनाने नविन ऊर्जा व शक्ती प्राप्त होऊन अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रचंड प्रेरणा मिळते. आज राज्यात धर्माच्या नावावरूण जातीय द्वेष पेरला जातोय मात्र अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समता, शांतता व प्रेमाच्या सद्भाभावनेची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनानंतर आ.पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरूडे, जिल्हा उपाध्क्षश्खा सिताराम बोरूडे,युवकांचे महारूद्र किर्तने, मा.पंचायत समीती सदस्य किरण खेडकर, राजेंद्र जगताप, योगेश रासने, राजेंद्र हिंगे, विष्णू थोरात, गणेश सुपेकर, रामराव चव्हाण, राजू ढाकणे, श्रिराम फुंदे, राजेंद्र बोरूडे, बाळू बटुळे, विश्वनाथ खाडे, सुनिल ढाकणे, चंदू भापकर, अंबादास राऊत, भाऊ तुपे, आदी उपस्थित होते.
आमदार रोहीत पवार म्हणाले संत भगवान बाबांनी दऱ्याखोऱ्यातील वंचीतांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामज प्रबोधनाचे मोठे काम केले.शिक्षणाचे महत्व जुन्या काळात जनतेच्या लक्षात आणून दिल्याने या भागातीलच नाही तर महाराष्ट्रातील हाजारो-लाखो जन सुशिक्षीत झाले आहेत.
आध्यामातून समाज प्रबोधन करत संत भगवान बाबांनी समाजिक समता व शांतीचा दिलेला संदेश सर्वाच्च असून आज त्यानंच्याच विचारधारेवर मार्गक्रमण करण्याची निंतात आवश्यकता आहे. आपण सर्वांनी प्राप्त परिस्थिती बदलण्याची धर्मांध नव्हे तर भगवानबाबांच्या समतेची शिकवण अंगीकारली पाहीजे.
यावेळी मठाधिपती डॉ.न्यायाचार्य नामदेव शास्री सानप यांनी पवार यांचे स्वागत केले व पवार यांनी डॉ.नामदेव शास्री यांचे आशिर्वाद घेतले. येळी खरवंडी व पाथर्डी तेथे ठिकठिकाणी आ.पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.