रायगड जिल्ह्यातून मोबाईल चोरणारा जेरबंद ; अहमदनगर एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महागडे मोबाईल चोरी करणारा आरोपी खालापुर (जि. रायगड) येथून पकडला. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३, रा. विणेगांव, दांडवाडी, ता. खालापुर, जि. रायगड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोहेकॉ संदीप पवार, पोना रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, पोकाॅ अमृत आढाव, प्रशांत राठोड, चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२५ जानेवारी २०२४ रोजी तक्रारदार शुभम कुंडलिक वाफारे (वय २२, रा. कर्जुलेहर्या, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हे ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन मुंबई येथे जात असतांना त्यांचा कंटेनर केडगांव बायपास, अहमदनगर या ठिकाणी नादुरुस्त झाल्याने शोरुममध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे मित्राचे २ ॲपल कंपनीचे फोन, व १ विवो कंपनीचा फोन असे चोरुन नेले होते. चोरीचे घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११७/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
एलसीबी टिम’ने गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्यातील मोबाईल हे खालापुर (जि. रायगड) येथील आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने चोरी केले असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने दि.४ जानेवारी २०२४ रोजी खालापुर (जि. रायगड) येथे जाऊन आरोपीचा शोध घेता आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३ , रा. विणेगांव, दांडवाडी, ता. खालापुर, जि. रायगड) हा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम जाधव याच्या कब्जातून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे त्यामध्ये २ आयफोन व १ विवो कंपनीचा मोबाईल काढून दिले. आरोपीस अहमदनगर येथे आणुन त्यास पुढील तपासकामी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.