रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- जिल्ह्यातील जलप्रकल्पामध्ये उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपिकाला मिळावे यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडण्याचे निर्देश राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
यावेळी खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पा., आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील जलप्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. पिण्याला, उद्योगांना पाणी आरक्षित करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीपिकालाही वेळेनुसार पाणी मिळेल,यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. जलप्रकल्पातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच पाणी शेतपीकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यकतेनुसार चाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी. पाण्याचा अनाधिकृतपणे उपसा होणार नाही यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी मुळा कालवा, निळवंडे, भंडारदरा गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचा विस्तृतपणे आढावा घेतला.
उपस्थित लोकप्रतिनिधीनींही आवर्तनाच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सुचना केल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!