. बुधवारी 19 मार्च रोजी जिजाऊ रथ यात्रा अहिल्यानगरमध्ये येणार ः सुरेश इथापे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रा दि.18 मार्च रोजी किल्ले वेरुळ येथून सुरु होत त्याच दिवशी सायंकाळी 5 च्या दरम्यान नेवासा येथे आगमन होणार आहे. 19 मार्च रोजी अहिल्यानगर शहरात जिजाऊ रथयात्रा येणार आहे. या संदर्भात नियोजन बैठक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी रथयात्रेचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे म्हणाले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.पुरुषोत्तोम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा दि.18 मार्च रोजी किल्ले वेरुळ येथून सुरवात करत 1 मे रोजी लाल महाल (पुणे) येथे रथयात्रेचा समारप होणार आहे. महाराष्ट्र ही संताची व महामानवाची जन्मभुमी आणि कर्मभुमी आहे. शेकडो वर्षापासून संत महात्मे आणि महामानवांच्या पुरोगामी विचारांने देशाला व माणसांना जोडणार्या शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचारांने राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. पंरतु मागील काही वर्षात राज्यातील सामाजिक, धार्मिक व राजकीय वातावरण बिघडले आहे. काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूूर्वक महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा व महापुरुषांची बदनामी करत सतत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे. आज जगातील ज्या देशात धार्मिक, जातीय व वर्णभेद निर्माण झाले, ते देश रसातळाला गेले आहे. तसे आपले होवू नये यासाठी महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये सलोखा व धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्या मध्ये एकता बंधूता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून तरुणांमधील व्यसनाधिनता कमी करत तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करत सहकार्य करत बेरोजगारी कमी करणे तसेच व्यसनाधिनता व बेरोजगारीमुळे निर्माण झालेले अविवाहीतांचे प्रमाण कमी करत कुटुंब सुखी समाधानी कसे होईल या संदर्भात जिजाऊ रथयात्रेद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे परकाळे यांनी संगितले.
या प्रसंगी मराठा सेवा संघाच्या उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत आवारी यांनी सांगितले की, रथयात्रेच्या माध्यमातून मराठा जोडो अभियान अंतर्गत सर्वंच बहुजन समाज जोडणे, मराठा आरक्षण प्रश्नावर दिशादर्शक मार्ग काढणे , मराठा आरक्षणा आडून ओबीसी बांधवात निर्माण केलेली भिती कमी करत सर्वंच बहुजन समाज जोडत समाजाच्या मुलभुत समस्यांवर उपाय योजना करणे हा या रथयात्रेचा उद्देश आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अॅड.स्वाती जाधव यांनी अहिल्यानगर जिल्हयातील सर्व बहुजन समाज बांधवांना आवाहन केले की, जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येवून आपल्या समस्यावर मार्ग काढण्याची संधी आहे. शासन स्तरावर अनुदान वाटपाची खैरात केल्याची जाहिरात बाजी केली जात असून 10-20 टक्के महिला भगीनी तथा शेतकरी विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आव आणला जात असल्याने समाज बांधव अत्यंत हालाखीतुन जात आहेत. यास्तव सर्वांनी एकत्र येणेे गरजेचे असल्याने या जिजाऊ रथयात्रेत सामिल होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांनी सांगितले की, 18 मार्च रोजी जिजाऊ रथयात्रा नेवासा येथे सायंकाळी 5 च्या सुमारास येत आहे. त्या ठिकाणी स्वागत व सभा होणार असून मुक्काम अहिल्यानगर येथे होणार आहे. सकाळी 9 ते 11 या कालावधीत अहिल्यानगर शहरता या रथयात्रे द्वारे संवाद साधत मिरवणूक काढली जाणार आहे. सौरभ खेडेकर हे समाज बांधवासोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर ही रथयात्रा दौड रोड मार्गे श्रीगोंदा येथे दुपारी 2 ला पोहचणार आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी रथयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. श्रीगोंदा येथील शेख महंमद महाराज यांचे दर्शन घेवून तेथे समाज बांधवांसोबत संवाद साधत रथयात्रा पेडगाव येथे संभाजी महाराज स्मृतीस्थळी पोहचणार आहे. तेथे दर्शन घेत त्या परिसराची पाहणी करुन जिजाऊ रथयात्रा पुढे दौंडकडे मार्गक्रमण करेल तरी सर्व बहुजन समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मराठा पतसंस्थेचे संचालक ज्ञानदेव पांडूळे, उदय अनभुले, अमोल लहारे, मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष अनिकेत आवारे, इंजि.श्रीकांत निंबाळकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अॅड.स्वाती जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा योगिता कर्डिले, शहराध्यक्षा सुरेखा कडूस,अॅड.रविंद्र शितोळे, बापू साठे आदींनी केले आहे.