पाथर्डीत नेते मनोज जरांगे पा. यांच्या स्वागतासाठी ॲड.ढाकणेंकडून जय्यत तयारी

पाथर्डीत नेते मनोज जरांगे पा. यांच्या स्वागतासाठी ॲड.ढाकणेंकडून जय्यत तयारी 
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे येथे दि.21 जानेवारी रोजी पाथर्डी तालुक्यातून पदयात्रा घेऊन येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी केली आहे. पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपासून त्यांच्या स्वागतासाठी भव्य नियोजन करण्यात आलेले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातून मुंबईपर्यंत पाईपद यात्रा घेऊन उद्या निघताहेत ही पदयात्रा गेवराई मार्गे पाथर्डी तालुक्यातून जाणार आहे त्यासाठी मराठा समाजासह इतर ओबीसी समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. दि. 21 जानेवारी रोजी सकाळी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी या जिल्हा हद्दीत जरांगे पाटील यांची पदयात्रा प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत हजारो आरक्षण सैनिक असणार असल्याने त्यांच्या पाथर्डी तालुक्यातील प्रवासात कुठल्याही प्रकारची अडचण समस्या येऊ नये यासाठी आज प्रतापराव ढाकणे यांनी त्यांच्या निवासस्थानी एक बैठक बोलावली त्यामध्ये पदयात्रेचे स्वागताचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी बोलताना प्रतापराव ढाकणे म्हणाले, मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने या लढ्याला मोठे स्वरूप प्राप्त झालेले आहे. जरांगे पाटलांची त्यागाची भावना लक्षात घेऊन एक व्यक्ती समाजासाठी सर्व त्याग करून समाजाच्या भल्यासाठी लढतोय ही गौरवस्पद बाब आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मतमतांतरे असू शकतील मात्र मला सारंगे पाटलांच्या लढवय्या भूमिकेचं कौतुक वाटतं म्हणून मी आणि आमचे सर्व सहकारी त्यांचे पाथर्डी तालुक्याच्या आगमनापासून प्रस्थान पर्यंत स्वागतासाठी तयार असणार आहे. पाटलांचीमुंबईला पदयात्रा घेऊन जाणे जरांगे पाटलाचा हा निर्णय विषय असून त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा सामाजिक भेदभावाचा असू शकत नाही इतर कोणत्या समाजाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी बिलकुल नाही, ते त्यांच्या रास्त मागणीसाठी मागील सहा महिन्यांपासून लढा देत आहेत.जरांगे पाटील दि. 21 तारखेला पाथर्डी तालुक्यातून मुंबईच्या दिशेने जात आहेत. त्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे त्यासाठी मिडसागवी, खरवंडी, टाकळी फाटा, शेकटे,तनपुरवडी व पाथर्डी या ठिकाणी मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर निघालेले या पायी दिंडीला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामध्ये वैद्यकीय, जेवण, पाणी इतरांनी प्रकारच्या सर्व सुविधा पाथर्डी तालुक्यातून नगरच्या दिशेने रवाना होईपर्यंत त्यांना मिळणार आहेत.
या बैठकीला माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, राजेंद्र जगताप, विष्णू थोरात, अनिल बंड, राजेंद्र बोरुडे, देवा पवार, बाजार समितीचे माजी सभापती बन्सी आठरे, जालिंदर वामन,अशोक कर्डिले, चंद्रकांत भापकर, बाळासाहेब देवढे, त्रांबक देशमुख,अरुण मुखेकर, बाळासाहेब कोठुळे,भाऊराव पवार, राजेंद्र गाडे व बाबा गायके उपस्थीत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!