हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले : गाडेकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील नेप्ती गावातील हिंदू मुस्लिम बांधव वर्षभर सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम एकत्रित येत मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखला जात असून, याला धार्मिकतेचे खूप मोठे महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव उपवास धरत असून रमजान उपासाची सांगता इफ्तारणे होत असते. यासाठी कल्याण रोडवरील सागर भेळचे संचालक शिवाजी गाडेकर, सागर गाडेकर यांच्या वतीने मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले.
नगर तालुक्यातील नेप्ती येथे हिंदू बांधवांच्या वतीने मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण होळकर सामाजिक कार्यकर्ते पोपट मोरे, सागर भेळचे संचालक शिवाजी गाडेकर, सागर गाडेकर, चेअरमन अशोक जपकर, मच्छिंद्र होळकर, नाथा जपकर, बाळासाहेब बेल्हेकर, दिलीप होळकर, बापू जपकर, विजय लांडे, बंडू होळकर, कुमार होळकर, बादशाह सय्यद, ओम गाडेकर, धीरज जपकर, जमीर सय्यद, रवींद्र होळकर, जावेद सय्यद, वाजिद सय्यद, गुलाब सय्यद, आयुब सय्यद आदीसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या समाजामध्ये जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे समाज एकमेकापासून दुरावत चालला आहे. आता समाजाला एकत्र आणण्याचे काम फक्त धार्मिक कार्यक्रमातूनच होऊ शकते. नेप्ती गावातील ग्रामस्थ वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सण मोठ्या उत्साहात साजरे करत असतात हिंदू मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्याचे काम केले आहे. असे मत सागर गाडेकर यांनी व्यक्त केले.