कर्नाटक हिजाब : यास फार महत्त्व देऊ नका ; गृहमंत्री वळसे पा.

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई-
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वाद चिघळत जात आहे. विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत, दगडफेक करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सरकारने पुढील तीन दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या याप्रकरणासंबंधित उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला नसून सुनावणी होणार आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून या विषयाला फार महत्त्व देऊ नये असे आवाहन लोकांना केले.


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.’
दरम्यान याप्रकरणाबाबत सोलापूर पोलिसांनी ट्विट करून सावधानतेचा इशारा दिला आहे. सोलापूर पोलीस म्हणाले की, ‘कर्नाटक राज्यातील हिजाब विवाद प्रकरणी अफवा पसरवू नका. अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नका. अफवा ठरू शकतात जीवघेण्या.’

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!