आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या विरोधात उच्च न्यायालयात गुन्हा व दोषारोप पत्र रद्द
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर- १६ जुन २०२३ रोजी फिर्यादी अमोल लांडगे यांनी आरोपी तात्याराम लांडगे (मेजर) व सुधीर करंजुले (मेजर) व इतर ९ आरोपी यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये भा.दं. वि. कलम ३०६, ३४१, ५०४,५०६, व ३४ अनन्वे गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याची माहिती अशी की, गुन्ह्यातील सर्व आरोपी यांचा व फिर्यादी यांचा शेत जमिनीच्या बांधावरून पूर्वीचा वाद होता, आरोपी तात्याराम लांडगे यांनी फिर्यादी यांचे शेततळ्याचे काम बंद पाडले व फिर्यादी यांचा शेतात जाण्याचा रस्ता अडवला व आरोपी सुधीर करंजुले यांनी फोनवरून धमक्या दिल्या. आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली, त्यामुळे फिर्यादी यांचे वडील मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी दि. १६ जून.२०२३ फिर्यादी इतर आरोपी यांनी यांनी फिर्यादी यांच्या वडिलांनी सुसाइड नोट लिहुन आत्महत्या केली. अशा प्रकारचे आरोप करून फिर्यादी यांनी दि.१६ जून २०२३ रोजी आरोपी यांच्यावर न कलमान्वये यांच्या नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्यात तपास करून न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केली. आरोपी यांना फिर्यादी यांनी गुन्ह्यामध्ये पुर्वीच्या वादामुळे चुकीच्या पद्धतीने गोवलेले आहे म्हणून, आरोपी तात्याराम लांडगे व सुधीर करंजुले यांनी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दोषारोपत्र आरोपीच्या विरोधात रद्द करण्यात यावे, यासाठी अँड. सुधीर आर. झांबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
प्रकरणाच्या सुनावणीवेळी आरोपी यांचे वकील ॲड. सुधीर आर. झांबरे यांचे वकील यांनी आरोपी यांना गुन्ह्यात पूर्वीच्या वादामुळे गोवण्यात आलेले आहे. आरोपीच्या विरोधातील आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचा युक्तिवाद केला. आरोपीचे वकील व फिर्यादीचे वकील यांचा युक्तिवाद झाल्यानंतर उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी गुन्हा व दोषारोपत्र आरोपींच्या विरोधात रद्द केले.