अहमदनगर बार असो.चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video)
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी अहमदनगर बार असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांना बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.